समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० डिसेंबर, २०२३

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था




    
विचक्राफ्ट
( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होताजादू, टोना आणि तत्सम बाबीशी संबंधित हा धर्मसैतानाचीपूजा करणारा म्हणून ओळखल्या जातो
जादू-टोण्यातूनजन्म झालेला हा धर्म पुढे अध्यात्मिकतेच्या दिशेने प्रवास करतो; मात्र त्यानंतर जास्त काळ टिकून राहू शकला नाही. फक्त पन्नास वर्ष हा धर्म जोमात होता, नंतर मात्र याला उतरती कळा लागली. मात्र पन्नास वर्षाच्या आपल्या प्रभावामुळे याने इतिहासात आपले नाव कायम केले. इतर धर्माप्रमाणे या धर्मातही साधना आहे, पूजा विधी आहे, अलौकिक तत्वज्ञानसूद्धा आहे.


     विचजिला आपल्याकडेडायनम्हणून ओळखल्या जाते. यांना कधीही समाजात सन्मानाचे स्थान मिळाले नाही. नेहमी त्यांचा संबंधअनिष्टांशीजोडण्यात आला. जादूचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करणाऱ्यानाही दुर्दैवाने स्वतःची वेगळी ओळख ठेवता आली नाही


    चौदाव्या शतकापासून जवळपास अठराव्या शतकांपर्यंत, ‘विचक्राफ्टख्रिश्चनविरोधी मानल्या गेल्यामुळे ते निषिद्ध होते. सैतानाशी संगनमत करून अद्भुत शक्ती मिळवणारे निधर्मी, देवांचे शत्रू म्हणून त्यांना मारून टाकण्यात येत असे. हजारो लोकांना तेविचक्राफ्टला मानणारे असल्याच्या नुसत्या संशयावरून, त्यांचे  हाल-हाल करून , त्यांना मारून टाकल्या गेले. त्यांच्या बाबत रंजक आणि थरारक गोष्टी पसरवण्यात आल्या. ते सैतानाशी स्वतःच्या रक्ताने लिहिलेला  करार करतात, सैतानासोबत दरवर्षी एकदा मध्यरात्रीला सर्व मिळून मेजवानी करतात तेंव्हा विधी म्हणून सैतानाच्या पार्श्वभागाचे चुंबन घेतात आणि मेजवानीत लहान मुलं भाजून खातात. या सर्व कथांना कुठलाही पुरावा नाही मात्रडायनया प्रकाराबाबत राग, द्वेष, आणि मुख्य म्हणजे भीती पसरवण्यासाठी त्या पुरेशा होत्या. या धर्माला मानणाऱ्या लोकांच्या बाबतीतील प्रत्येक गोष्ट अतिरंजित, अतिशोयक्तीपूर्ण होतीत्यामुळेचविचहंटिंग' नावाचा एक नवा प्रकार सुरु झालाअशा सर्वडायन' ला पकडून मारून टाकण्यासाठीविचहंटरम्हणून जगावेगळा  व्यवसायच सुरु झाला. दुसऱ्या महायुद्धानंतरविचक्राफ्टधर्म म्हणून उदयाला येऊ लागला होता मात्र लगेच १९५३ मध्ये विचक्राफ्ट विरोधी कायदा अंमलात आल्यामुळे त्याचा पुढील प्रसार थांबला


    विचक्राफ्टया शब्दाचे तीन अर्थ आहेत हे आधी आपण स्पष्ट करायला हवे. पहिला अर्थ म्हणजेजादू ही एक कला आहेज्यामध्ये चांगल्या-वाईट गोष्टीसाठी मंत्राचा उपयोग करून जादू टोणा केल्या जातो. दुसरा अर्थ म्हणजे सैतानाची पूजा करण्याच्या पद्धतीलासुद्धाविचक्राफ्टम्हटल्या गेले, तर तिसरा अर्थ म्हणजे एक धर्म म्हणून. (विचक्राफ्ट: ‘धर्म' या अर्थाने वापरावा लागतो तेंव्हा त्यातील ‘W’ हे अक्षर मोठ्या लिपीतील लिहिल्या जाते. इतर अर्थासाठी छोटा ‘w’ वापरतात.) गमतीशीर गोष्ट म्हणजे हे तिन्ही अर्थ एकमेकांत इतके गुंतून आहेत की, त्याचा तोटा विचक्राफ्टलाधर्ममानणाऱ्या लोकांना झाला.


    यासंदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ‘पॅगनम्हणजे निसर्गपुजकांचा धर्म. या निसर्गपुजकांच्या अनेक उपशाखा आहेत. त्यातील एक शाखा म्हणजेविचक्राफ्टहोय असे अनेक अभ्यासक समजतात. जेराल्ड गार्डनर नावाच्या व्यक्तीलाविचक्राफ्टया धर्माचा प्रणेता मानल्या जाते. त्याच्या विचारांना मानणाऱ्यानी निसर्गपूजक धर्माचा, निसर्ग देवतांचा, निसर्ग पूजक विधींचा नव्याने अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चन आणि ज्यू धर्मामध्ये असलेली पुरुषप्रधानता झुगारून, औपचारिकता बाजूला सारून, मानवी समाजावर त्यांचा अंकुश नाकारून एक स्वतंत्र, स्वायत्त विचार घेऊन आणि निसर्गाशी प्रत्यक्ष संपर्क साधून दैवीशक्तीशी समरूप होता येते ही मांडणी  ‘विचक्राफ्टधर्माने केली



पुजारी, मौलवी, पादरी यांच्यासारख्या दलालांना त्यात स्थान नाही. ‘स्त्रीत्यांच्यासाठीनरकाचे द्वार' नसून ती पूजनीय होती. संभोग त्यांना वर्ज्य नव्हता तर तो उत्सव होता. १९६०च्या दशकात निसर्गपुजकांमध्येविचक्राफ्टएक धर्म म्हणून आश्वस्त करत होता. त्यातील मुख्य  धारणा, मूल्ये आणि नियमन व्हायला लागले होते. असे असले तरी त्यात लवचिकता होती, प्रवाहीपण होते. ज्यामुळे धर्म म्हणून उत्क्रांत होण्याची मुभा मिळत होतीअध्यात्मिक, गूढवादी असा ईश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणून अनेकांना त्याचा मोह होत होता


    विचक्राफ्ट म्हणजे पर्यायाने निसर्गपूजकांचे अनेक पंथ उदयाला येत होतेच. मात्र या सर्वांची गोची एक गोष्टीमुळे झाली. ती म्हणजेविचक्राफ्टहा शब्द... 


            विच, डायन , सैतान यांची पूजा करणाऱ्यांनासुद्धा हाच शब्द उपयोजल्या जात असल्यामुळे, धर्म म्हणून त्यांच्याशी नकारात्मकता जोडल्या गेली. त्यामुळे मुख्य धर्मियांना विरोध करण्यासाठीं आयते कोलीत मिळाले. तसेही पुरुषप्रधान मानणाऱ्या धर्मांना हा स्त्रीप्रधान धर्म रुचला नाही. नैतिकतेचा आव आणणाऱ्यांना यातील संभोगविधी खटकत गेले. ख्रिश्चनांमध्येननकिंवापादरीयांना आजीवन ब्रह्मचर्य पाळावे लागत असे. त्याविरुद्ध भूमिका घेणारा धर्म त्यांना नाकबूल होता. देव आणि माणूस यांच्यातील दुवा म्हणूनदलाली' करणाऱ्यांना आपले महत्त्व कमी व्हायची भीती सतत वाटायची म्हणून आजपर्यंत त्या प्रत्येक धार्मिक चळवळीला त्यांनी नष्ट केले जे ईश्वराशी त्यांच्या शिवाय एकरूप होण्याचा विचार मांडत आले. विचक्राफ्ट हा त्यांच्या अस्तित्वाला धोका होता. त्यांनी पद्धतशीरपणे त्यांना संपवले



मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

Panic आणि मेंढपाळ... व '&' जणू इंग्लिश मधील झपूर्झा...

(०१) Panic आणि मेंढपाळ

"Words, words, words" शेक्सपिअरलिखित Hamlet नाटकाच्या मुख्य-पात्राच्या तोंडी आलेला हा एक डायलॉग आहे. त्याला विचारले जाते कि तू काय वाचतोय तर तो म्हणतो मी वाचतोय 'शब्द, शब्द,शब्द'
Pan: अर्धाशेळी-अर्धामाणूस.
शब्दांची दुनिया वेगळीच आहे. एक मात्र मला कळले कि, आपण या शब्दांशी खेळायला लागलो कि यांच्यासारखे मनोरंजन करणार दुसरे काहीही नाही हे जाणवते...
हा खेळ करतांना सुरुवातीला आपले तर्क लावत जातो.. मग त्या तर्कातून अनेक प्रश्न सापडतात आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी मन आतुर होते... शब्द कोणत्याही भाषेतील असो पण प्रत्येक शब्दाची एक कहाणी असते. कधी-कधी शब्दांच्या कहाण्या इतक्या मस्त असतात कि माणसाच्या गोष्टी फिक्या वाटाव्या..
आज असाच एक ‘शब्द’ शब्दशा डोक्यात गेला... इंग्रजीतील Panic हा शब्द... आणि याने एवढ भंजाळून सोडल कि नेमका हा शब्द तयार कसा झाला याचा शोध घ्यायचे ठरवले...
शब्दांशी खेळतांना पहिली गोष्ट मी कुठली करत असे तर त्या शब्दाला तुकड्यात तोडतो आणि त्यातील सगळ्यात महत्वपूर्ण तुकडा(निदान काहीतरी अर्थ असेल असा तुकडा) हाताशी घेतो. Panic ला तोडले तर pan हा तुकडा महत्वाचा वाटला. मग यावर सुरु झाली तर्काची शृंखला...
pan हा शब्द मला माहित असलेले किती अर्थ सांगून जातो. frying pan मधील pan, चुका काढणे या अर्थाने pan वापरल्या जातो.....असा विचार करत गेले कि अचानक काहीतरी धागा सापडल्यासारखा वाटतो तेंव्हा pain-panic असा सहसंबंध आठवतो. मला व्यक्तिशा pain व panic हे दोन्ही शब्द एकाच कुटुंबातील सावत्र भावू वाटतात... दिसायला सारखे बापामुळे पण आई वेगवेगळी असे दोन सावत्र भावंड....बस इतकाच संदर्भ हाताशी येतो पण तर्क पुढे काही जात नाही... झालेच तर Andrew Marvell च्या 'Garden' नावाच्या कवितेतील Pan नावाच्या देवाचा विचार डोक्यात येतो. त्याच्याशी याचा काही संबध असेल असे वाटत नाही पण खरेतर इथेच मी चुकतो. हे चुकनेही आनंद देणारे आहे. शब्दांशी खेळण्यात एक मजा आहे, आपला तर्क बरोबर आला याचा आनंद तर होतोच पण तो तर्क चुकून काहीतरी दुसरे कळले कि त्याचाही आनंद होतो. Panic या शब्दाचा सर्व संबंध त्या ग्रीक दंतकथेतील Pan नावाचा मेंढपाळाच्या देवाशीच आहे हे संदर्भ चाळल्यावर मला कळते... आणि मग शब्दच्या कहाणीत शिरायला मन आतुर होत गेले....
Panic शब्दाचा मागोवा घेत Pan या ग्रीक देवतेच्या गोष्टीत शिरलो. Pan हा ग्रीक-पुराणकथेनुसार मेंढपाळांचा देव. त्याचे वडील हर्मस आणि आजोबा झेवूस(आपल्याकडील इंद्रासारखा). Pan हा सुपिकतेचा देव म्हणून सुद्धा ओळखला जातो. Pan च्याबाबतीत आणखी एक विशेषतः सांगावीशी वाटते. त्याने आपल्या वडिलांकडून हस्तमैथुन कसे करावे हे शिकून घेतले आणि ती कला इतर मेंढपाळांना तो शिकवत असतो. (हा संदर्भ लक्षात येताच ‘ख्वाडा’ या मराठी सिनेमातील प्रसंग सहज आठवेल.)

तर हा असा Pan नावाचा मेंढपाळांचा देव. एकदा काय झाले कि Gods आणि Titan (आपल्याकडील सूर व असुर युद्धासारखे) यांच्यात युद्ध सुरु होते तेंव्हा Pan वामकुक्षी घेत होता. नेमके तेंव्हाच Titans देवलोकावर हल्ला चढवतात. त्यांच्या आवाजाने Pan खडबडून झोपेतून उठतो... झोपेतून अचानक उठल्यामुळे व Titans च्या आवाजाने स्वतः खूप घाबरतो व जोर-जोराने ओरडायला लागतो. त्याचे ते भीतीने गांगरून मोठमोठ्याने ओरडल्यामुले देवांवर आक्रमण करायला आलेले Titans बिथरतात, त्यांची घाबरगुंडी उडते. त्यांच्या त्या भांबावल्या अवस्थेचा देव फायदा घेतात व Titans वर कुरघोडी करत विजय मिळवतात. नंतर Pan स्वतः सगळ्यांना सांगत फिरतो कि त्याच्या आवाज केल्यामुळेच देवांना विजय मिळवता येवू लागला. एकंदरीत भीतीने सगळ्यात पहिले घाबरगुंडी कुणाची उडाली असेल तर ती Pan या देवाची म्हणून तशा प्रकारच्या मानसिक स्थितीला Panic होणे असे म्हणायला लागले... असा सगळा मामला आहे. आणखी एक तर्क लक्षात येतो कि, Pan जसा कि मेंढपाळचा देव आणि मेंढी,बकऱ्या असले प्राणी भित्रे असतात. यांचा खुपदा शिकार करण्यासाठी 'चारा' (bait) म्हणून वापर केल्या जातो. तेंव्हा त्या भीतीने, मृत्यू भयाने Panic होतात आणि ओरडायला लागतात. सुरुवात शब्दाचा अर्थ शोधण्यापासून जरी झाली असली तरी तो शब्द अनेक कहाण्या,दंतकथा, किस्से उजागर करत असतो आणि सगळ कस सुसूत्रीत वाटायला लागते....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०२)Cataract....धबधबा ते मोतीबिंदु एक प्रवास....

'...the sounding cataract hunted me like a passion..." वर्डसवर्थ च्या एका बोजड कवितेतील हीच एक ओळ मला आवडली... एक मस्त मिजास आहे आणि मनमौजीपणा आहे या ओळीत... असो..
या ओळीतील cataract शब्द म्हणजे धबधबा या अर्थाने वापरलेला आणि तोच त्याचा मुल अर्थ आहे.. आणि तो उच्चारते वेळी जिभेची होणारी टोकदार हालचाल त्या शब्दाला आठवणीत ठेवून गेली... गंमत म्हणजे या शब्दाचा आणखी एका अर्थाने उपयोग करतो तो म्हणजे ‘मोतीबिंदू' ... विचार केला तर असे वाटते कि त्यांचा एकमेकांशी अर्था-अर्थी काहीही संबंध नाही..!! पण शंका येतेच कि, जर तसा संबंध नसेल तर एकाच शब्दाला इतके भिन्न अर्थ कसे काय मिळाले...?
काही संदर्भ चाळले तर cataract शब्दाची गोष्ट उमगत गेली आणि त्याला भिन्न अर्थ का मिळाले हे कळले...
बेन जोन्सन नावाचा शेक्सपिअरच्याच काळातील एक मोठा नाटककार होवून गेला. त्याची काही नाटक वाचली(सायलेंट वूमन, अल्केमिस्ट इत्यादी. ती वाचल्यावर तो शेक्सपिअरइतकाच कर्तुत्ववान मला वाटला. पण शेक्सपिअरच्या यशामुळे तेंव्हा आणि आताही तो झाकोळल्या गेल्या. नेहमी त्याला दुय्यम दर्जा मिळाला... हे म्हणजे राहुल द्रविड सारखा प्लेअर सचिनसारख्या प्लेअरमुळे उपेक्षित राहिला तसेच झाले...
त्या बेन जॉन्सन ने 'कॉमेडी ऑफ ह्युमर' हा नाटकातील प्रकार आपल्याला दिला आहे. त्याची नाटके त्याच नावाने ओळखल्या जायची. आता यातील 'humour' हा शब्द आपल्या Cataract शब्दाला दोन अर्थ का आहेत याची किल्ली असेल असे मला कधीही वाटले नाही.
पूर्वी असा समज होता कि माणसाच्या शरीरात चार प्रकारची humours असतात. १. Black bile याला choler असेही म्हणतात. २. Yellow bile ३. Blood ४. pelgham
(आपल्याकडील वात,पित्त,कफ वगैर प्रकार असतात तसे.)
आता या ह्युमर्सच्या कमी- जास्त प्रमाणामुळे व्यक्तीच्या स्वभावात/प्रकृतीत फरक पडतो. बेन जॉन्सन च्या नाटकातील पात्र याच थेअरीवर त्याने उभी केली होती. म्हणून त्याच्या सुखांतीकेला Comedy of humours म्हणायचे ....
वरील माहिती लक्षात ठेवून Cataract शब्दाला बघितले तरी काही सापडणार नाही. पण तिथेच सगळे लपून आहे.
Cataract या शब्दाचा खरा अर्थ हा 'धबधबा' असाच होतो पण नंतर तो डोळ्यांच्या एका रोगाशी कसा जोडण्यात आला हेच कोड सोडवायचं आहे... तर..
मोतीबिंदू हा रोग जेंव्हा जुन्या लोकांना कळला तेंव्हा त्यांना वाटले कि त्या चार humours पैकी जो जास्त होतो तो humour डोळ्यावाटे बाहेर येतो/बाहेर पडतो. किंवा ओघळतो.... इतकेच नाही तर अशा रोगाला सुरुवातीला पर्शिअन लोक 'पाणी येणे/ओघळने' या अर्थाचा एक पर्शिअन शब्द वापरायचे.. त्या शब्दाचा प्रभाव आणि humour थेअरी यांचा एकत्रित परिणाम म्हणून डोळ्यातून धबधबनारे पाणी असा एक सुलभ अर्थ घेतल्या जात असेल आणि अशा या डोळ्याच्या रोगाला Cataract म्हणजे धबधबा हाच शब्द रूढला असेल....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०३) '&' इंग्लिश मधील झपूर्झा...

Beowulf हे इंग्रजीतील पहिले महाकाव्य... या महाकाव्यात and या शब्दासाठी & हे चिन्ह किंवा 7 हा आकडा वापरल्या गेला होता. त्या महाकाव्याच्या हस्तलिखीतात तो तसा वापरल्या गेल्याचा पुरावा आहे. आता & या चिन्हाला and हा अर्थ का आहे....? तशी असण्याची कारणे काय...? त्याची कुठली कहाणी आहे का..? अस डोक खाजवत थोडी शोधा-शोध केली... ती करण्याआधी चार जाणकार लोकांना विचारले... थोडी माहिती मिळाली... आणि हळूहळू गोष्ट समजत गेली...
& याला इंग्रजीतील २७ वे अक्षर म्हणून पूर्वी ओळखायचे. याचा अर्थ 'and' असा घेतात आणि याला Ampersand म्हणून ओळखतात. Ampersand हा शब्द 'and per say and' याचेच लघु-रूप आहे. मराठीत्तील जसा झपूर्झा शब्द 'जा पुढे जा पोरी जा पुढे जा' याला खूप वेगाने वाचले कि तयार होतो.(वाचून बघा) तसाच 'and per say and' याला वाचले कि Ampersand हा शब्द तयार होतो.. मराठीत त्याला '...आणि आणखी पुढे.." असा अर्थ आपण घेवू शकतो.
जसे कि वर म्हटले आहे, पूर्वी याला २७ वे इंग्रजी अक्षर म्हणून ओळखायचे म्हणून यालाही a,b,c,d... सारखे चिन्ह देण्यात आले. हे ‘&’ चिन्ह इतर अक्षरांच्या चीन्हापेक्षा थोडे गुंतागुंन्तीचे होते. असायलाही हवे कारण हे चिन्ह एकाचवेळी अक्षर व शब्द म्हणून वापरल्या जाते. Beowulf या महाकाव्यात याचा सढळ वापर केलेला दिसून येतो फरक फक्त इतकाच आहे तेंव्हाच्या लिपीत या चिन्हाचे स्ट्रोक्स थोडे वेगळे होते. खुपदा तर and या अर्थासाठी & या चिन्हाएवजी इंग्रजीतील '7' हा आकडा सुद्धा वापरलेला दिसून येतो. आता तो '7' चा आकडा आणि & हे चिन्ह यांच्यात काय संबंध असा प्रश्न पडणे साहजिक आहे....
& आणि 7 या आकड्याचा काय संबंध म्हणून सरळ गणिताचे प्राध्यापकानां गाठले. आपली. त्यांच्या बोलण्यातून सहज कळले कि गणितात '/\' अशा स्वरूपाचे चिन्ह 'and' या अर्थाने वापरतात. हाच प्रकार logic मध्ये आहे. कदाचित पूर्वी '/\' याच चिन्हाला '7' असे लिहित असतील असा तर्क काढला. आणि माझ्यापुरता शांत झालो.
(*टाईपतानां आणखी एक जाणवल आणि खूप आनंद झाला. laptop च्या किबोर्डवर & चिन्ह आणि 7 चा आकडा एकाच ठिकाणी आहे... आता हा नक्कीच योगायोग नसेल आणि असलाच तर खूप मजेशीर योगायोग आहे....)
#शब्दांच्या_गोष्टी
#Words_words_words



Top of Form



शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

'उपर जाते जा, नीचे आते जा!"



आजोबांच्या गोष्टी......

तशा काही फार दीर्घ आणि तत्त्वज्ञान नाहीय त्यांच्या गोष्टीत... अगदी साध्या-सुध्या आणि मनोरंजक आहेत... त्यांचा हा खजिना मी विसरत चाललो होतो पण आता इथे काही आठवणार्या आणि काही न आठवणार्या गोष्टी सुद्धा पोस्टणार आहे... त्या गोष्टींचे अनेक वर्जन असू शकतात... तुम्हालाही आठवत असतील तर तुम्ही त्या पोस्ट ला मला tag करा....आज पहिली गोष्ट सांगतोय....(आबा वऱ्हाडीत गोष्ट सांगायचे...म्हणून थोडी वऱ्हाडी बोली वापरतोय...)

'उपर जाते जा, नीचे आते जा!"

पोट्ट्या... तुले एक गोष्ट सांगतो  आईक...

एका गावात एक कास्तकार होता . पयले बरा शिरमंत होता पण तिगस्ता त्याच्या भावांन त्याची जिमीन हडपली अन त्याले मजुरीले लावल... दोन-दोन बायका त्याले आन पाच-सहा लेकरयीच लेंढार... मजुरी करून असा कितीक कमवे ...? बायका -पोराहीचे पोट बी भरत नोता..... पोरायचे शिक्शान तर दूरच रायल...

त्याले वाटे जगूच नही....जीव द्याव... मग येका राती गेला न तो आखारातल्या हिरीवर(विहिरीवर) जीव द्याले... हिरीच्या काठावर रायला उभा.... म्हणे आता उडी मारतो हिरीत अन देतो जीव.... तेवढ्यात हिरीतून आवज आला....

त्या  हिरीत येका भूताच बिर्हाड होत... तो भूत त्या हिरीतल्या पाण्याच्या अंदर  येक मोठ पेव करून आपल्या बायको अन पोरासंग रायत जाय...

त्या भूताले पाण्यातून दिसल न कि कोणीतरी जीव द्याले आल आणि आता उडी टाकते... तेवढ्यात भूतान आवाज लगावला....

"थांब रे बावा... काय झाल तुले ... काऊन मरत राजा... तुई अडचण त सांग मले!१"

कास्तकार घबरावला.... त्यान भेत-भेतच सांगितल भूताले कि , 'मायाकडे आता जमीन नाही, मले बरोबर मजुरी भेटत नाही...लेकरा -पोरायले खाऊ घालाचे वांदे होऊन रायले बावा! म्हणून त जीव द्याले आलो...."

भूत त्याची कायनी आयकून लयच दया करत होता...भूतान त्याले म्हणलं , "हे पाय दादा... तू काई जीव देऊ नको... मी तुयासाठी एक काम करू शकतो...पण त्या आंदी मले एक वचन दे...!"

कास्तकार म्हणे "सांगा ब्वा ! काय म्हणन आहे तुम्ह"
भूतान म्हटल मंग त्याले, " पहिली त गोष्ट तू कोणाले सांगू नको कि मी तुयासाठी  काम करतो... आन दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणशील ते काम मी करायले तयार आहो पण मले रोज काम सांगत जाय एकाही दिवसाचा खाडा चालणार नाही... ज्या दिवशी तुया मले काम सांगितल नाही त्या दिवशी मी तुया अन तुया लेकरा-बायकोचा जीव घेऊन घेईल.... कबुल अशीन त बोल"

कास्तकार लयच हरकला त्यान भूताच्या अटी कबुल केल्या....मंग काय  विचारता काय झाल.....

रोज भूत रामपायरी कास्ताकाराच्या दारात उभा काम करायले तयार....
कास्तकारण त्याले कोणतहि काम सांगितल  कि भूत  नीरा मिनटातच काम करून चाल्ला जाय....

पाटलाच्या धा एकर वावरातली पर्हाटी येच्याले सांगितली त भूत सकौन गेला अन दुपारी पुरी पर्हाटी येचून आला... पाटलाने कास्तकारले मजुरी देली... मंग त्यावर्षी कास्त्काराने भुताच्या जीवावर वावरातले काम उधळयान घ्याले सुरुवात केली...

रोज काही न काही काम भूताले तो सांगत जाय... आणि भूत काम करून निघून जाय... मजुरीचा सगळा पैसा कास्त्कारले भेटे... तो लय शिरमंत झाला... एका वर्षातच त्यान १० एकर जिमीन विकत घेतली... आता त्याले सुखाचे दिवस भोगायले भेटून रायले होते...

त्याचे पोर शाळेत जात...अभ्यास करत...बायकोच्या अंगावर सोन आल...नवीन घर बांधल....सगळ यवस्थित सुरु होत... पण त्याच्या जिवाले येग्ळाच घोर लागला...

भूताले रोज काम द्या लागे...ज्या दिवशी नाही देल त्या दिवशी भूत त्याले अन त्याच्या घारले मारून टाकणार होता... आता एखांद्यान रोज-रोज कामही कुठून आणावं?????

मोठ्या विवंचनेत होता कास्तकार.....पण  भूत  तर रोज पायटी  त्याच्या उरावर हजर असे.....काम सांग  म्हणे?

मंग कास्त्कारण एका जाणकार म्हतार्याले पकडल... अन त्याले सगळी हकीकत सांगितली.....जाणकार म्हातारा म्हणे मी सांगतो तस कर.....
पहिले तर  बैलगाडीन बाजारातून खंडीभर मवरी (मोहरी) ईकत घे अन येता-येता गावाच्या आंदी जे नदी लागते तिच्यात रेती आहे त्या रेतीत ते मवरी सांडून दे...पसरून टाक...अन  त्याले म्हणा आन येचून?????

कास्तकारन तसचं केलं.... पायटी भूत आला अन त्याले मवरी येच्याले पाठवल.... पण सायचा संध्याकैच भूत हाजीर ...म्हणे, "मालक काम झाल...उद्या येतो सकाऊन...काम तयार ठिवा!!"

कास्तकार डबल जाणकार म्ह्तार्याले भेटायले जाते....म्हतारा त्याले नवीन कलाकारी सांगते कि तुया वावरातल्या हिरीत टन भर मीठ टाक.... रातभरात ते ईरुन जाईन... मंग त्याले ते मीठ काढायले सांग....

पण दोन दिवसातच भूत मीठ पाण्यातून काढून आणते...अन कास्त्कारच्या उरावर  हजर ... म्हणे काम सांग....

भूताले लय येगयेगळ्या परकारचे काम सांगातल्या जातात... पण सगळे काम तो भर-भर करते..... त्याले त आकाशातले तारे मोजायले लावते पण तीन राती जागरण करून एवढे मोठे तारे भूत मोजून काढते.... अजून काय काय करायले लावते पण भूत त जुमानतच नाही न... मंग

कास्त्काराची  उडते घाबरगुंडी... आता काय कराव... गावातल्या शाळेतल्या मास्तरले भेटायाले जाते... त्यालेबी सारी हकीकत सांगते.....

मास्तर थोडस डोक लाऊन कास्त्काराच्या कानात सांगते.....

दुसऱ्या दिवशी भूत पायटी आल्या बरोबर कास्तकार त्याले काम सांगते... कि  हिमालयात जाऊन ततच सगळ्यात मोठ अन उंच झाड तोडून आन पण झाड सरकतीर पायजे... सरळसोट...

संध्याकाई भूत झाड घेऊन हजर.... हे अभायाले टेकिन येवढ उंच झाड आणते तो!

मंग त्याचा छाट काढ्याले सांगते....

मंग त्याच्यावरून रंदा मारून चोपड करायले सांगते....

मंग  म्हणते कि भूता आता या झाडाच्या खोडाले एवढ तेल लाव कि हे चोपड झाल पाहिजे...

भूत त्याले हजार पीप तेल लाऊन चोपड करते....

मंग त्याले त्या खोडाले गावाच्या येशिवर घेऊन जाय आणि तती रोऊन टाक... सरळ सोट.... उंच च्या उंच...

भूत हे काम बातच करते......

आता भूताले कास्तकार शेवटच म्हणते.... कि तुले मी आजपासून एकच काम देतो तेच करत जाय.....कोणत?

या खोडावर रोज वर चढत जाय अन खाली उतरत जाय....चढत जाय अन उतरत जाय...."उपर जाते जा...नीचे आते जा"

भूताले आता रोज एकच काम...

भूत लय दिवस हे करते.... शेवटी भूतही थकून जाते... खंगून जाते..... भुताची बायको कास्त्कारले विनंती करते कि माया नवर्याले सोडून द्या...
कास्त्कारले मंग दया येते अन तो भूताले सोडून देते...
सोडून देल्यावर भूताले विचारते...."कारे बाबू...पायजे का काम! पायजे अशीन तर ये....उपर जाते जा...नीचे आते जा!"

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

एक मराठा समाजातील तरुण म्हणून...

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती मला तितकीशी माहित नाही. पण विदर्भातील त्यातल्या त्यात अकोला,अमरावती,बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील मराठा समाजात मी वावरत असल्याने त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे जे काही आकलन मला झाले आहे त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने मला जाणवल्या त्या संक्षिप्त इथे मांडाव्या वाटतात....

एक मराठा तरुण म्हणून मराठा समाजा समोरील भविष्य काय आहे?

विदर्भातील बहुतेक मराठा समाज हा कुठल्या तरी फ़ैइल,पुरा किंवा नगरात राहतो उदा. द्यायचे झाले तर अकोट फ़ैइल, कमेटी फ़ैइल, सती फ़ैइल, हमाल पुरा आणि कॉपी राईट मिळवलेले शिवाजी नगर...ई. (मी इथे बहुतेक म्हणतोय) त्यामुळे तसे बघितले तर तो बर्यापैकी एकमेकांच्या संपर्कात असलेला आणि संघटन करून राहिलेला समाज आहे. मग आधीच संघटीत समाजाला प्रचंड मोर्चा काढून आपले संघटन शक्ती दाखवण्याची वेळ का आली?

वरील प्रश्नाचे उत्तर कळण्यासाठी आतापर्यंत काय स्थिती होती हे बघणे गरजेचे होते. मी काही समाज शास्त्रज्ञ नाही का कुठला शास्त्रीय अभ्यास करून निष्कर्ष मांडणारा नाही. या समाजातील एक शिक्षित तरुण म्हणून माझी काही निरीक्षण सांगतोय...

तर या भागातील बहुतेक मराठा तरुण हा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित होता. आजही आमच्या आधीची पिढी जर बघितली तर मोजके सोडल्यास सगळे अंगमेहनितीचे काम करणारे दिसतात. हमाल म्हणून, कुली म्हणून किंवा एकाद्या किराणा दुकानात काम करणारे म्हणून. विदर्भातील मराठा या लोकांवर हि स्थिती का आली तर त्यांनी मराठवाड्यातून जेंव्हा स्थलांतर(त्याची अनेक कारणे आहेत) केले तेंव्हा आपली शेती आणि घरदार सोडून इकडे आले. इकडे अंग मेहेनत केल्या शिवाय पर्याय नव्हता. खाणारे खूप असल्याने घरातील बायका-मुले सुद्धा कामाला जायची. मागच्या दोन पिढ्यांनी कसे बसे इथे दिवस काढले. अस जगत असतानाही त्यांना परत आपल्या मुळ गावी जावेसे वाटले नाही कारण तिथली परिस्थिती त्यापेक्षाही भयंकर होती.

इथे स्थाईक झाल्यावर काहींनी शेती विकत घेतली आणि काहींनी व्यवसाय निवडला. तरीही शिक्षणाच्या बाबतीत आम्ही मराठे मागास राहिलो. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून दूरच होतो. आमच्या आजच्या पिढीच्या आधीच्या पिढीला शिक्षणाचे महत्व पटायला लागले आणि त्यांनी आपल्या मुला बाळांना शाळेत घालायला सुरुवात केली. आता कुठे शिक्षित मराठा तरून दिसायला लागला. हा तरुण जेंव्हा ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आला तेंव्हा त्याला स्वतावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव व्हायला लागली. त्याची आर्थिक स्थिती ठीक नसतानाही शिक्षणाचा भला मोठा खर्च सहन करावा लागला. पुढे उच्च शिक्षणासाठी खूप अडचणी जाणवायला लागल्या. त्यातून तरुणांमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरायला लागली कारण त्यांना आर्थिक मागासलेपण पावलोपावली दिसत आले.

आजही जर प्रामाणिक सर्वेक्षण केले तर पंचाहत्तर टक्के मराठा बांधव आर्थिक दृष्ट्या मागासले आहेत. थोडक्या सधन मराठा समुहाचा विचार न करता, तथ्य लक्षात घेतली तर खरोखरच आरक्षणाची किती गरज आहे हे जाणवेल. सध्यस्थितीत जो मोर्चाने जोर धरलाय त्याचा विचार करता मराठी तरुणांनी आरक्षनाच्या मागणीला उचलून धरायला पाहिजे.  

कोपर्डी घटनेच्या आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ती होईलच त्यात कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अटरॉसिटी कायदा रद्द करणे हि गोष्ट मला थोडी अशक्य वाटते म्हणून त्यात शक्ती खर्च न करता (आणि त्या कायद्याचा सामाजिक संदर्भातील उपयोगिता लक्षात घेता) त्या कायद्यात योग्य त्या बदलाची मागणी करून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आलेल्या संधीचा उपयोग घेणेही तेवढेच गरजेचे आहे. कुणाला ठाऊक कि परत एवढा जनसमुदाय एकत्र येईल? मराठा बांधव भावनिक आहेत आणि त्यांच्या याच सद्गुणामुळे  आज ते एवढ्या मोठ्या संख्येने एक झालेत. आज त्यांना त्यांची मुले सुरक्षित वाटत नाहीत म्हणून ते पेटून उठलेत. हि आग शांत होण्या आधी हिचा योग्य वापर केल्या गेला पाहिजे आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी त्यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण होई पर्यंत असेच एक राहायला हवे.


आज खेड्यापाड्यातील मराठा तरुण शहरात होणार्या मोर्चात हिरहिरीने सहभागी होताना दिसत आहे कारण खेड्यात राहताना, शेती करताना आर्थिक अडचणी कशा जीवघेण्या ठरत आहेत हे आपण सगळे जाणतोच म्हणूनच खेड्यातील तरुण सुद्धा शेतीकडे तोंड फिरवायला लागलेत. आपल्या शेतीवर अतोनात प्रेम करणारा मराठा तरुण, लग्न ठरवते वेळी नोकरी नसली तरी चालेल पण मुलाकडे शेती आहे म्हटले तरी मुलगी द्यायला तयार असतात, एवढे शेतीचे महत्व ज्यांना वाटते तेच शेतीला दुय्यम समजत आहेत आणि नोकरी-व्यवसायाकडे वळत आहेत. याचा अर्थ याच नाही तर या आधीच्या सरकारांकडून शेतीकडे पार दुर्लक्ष झाले आहे. म्हणून मराठा शेतकऱ्याला शांत आणि संयमी ठेवायचे असेल तर शेती धोरणात आमुलाग्र बदल करावा लागणार आहे. जेणे करून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल आणि हा असंतोष नष्ट होईल. शेतीचा विकास अपेक्षित प्रमाणात झाला असता तर कदाचित मराठा समाज जो बहुंशी शेतीवर जगतो तो एवढा असंतुष्ट वाटला नसता. मध्यम वर्ग म्हणावे किमान एवढी जरी मला शेतीतून आवक मिळायला लागली तर मी आजही नोकरीच्या फंदात न पडता शेतीत गुंतलो असतो परंतु माझ्या बापाचे हाल बघितल्यावर मला त्या शेतीचा तिटकारा यायला लागला. मला इथे काही माझ्या आर्थिक परिस्थितीचे भांडवल करून सहानुभूती मिळवायची नाहीय.. माझे म्हणणे सहज आणि सरळ आहे कि आम्हा मराठा तरुणांसामोरील समस्या मोर्च्यातील बांधवांनी समजायला हव्यात आणि त्यानुसार आपल्या मोर्च्याला योग्य ते स्वरूप द्यायला हवे...   

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...